Show Mobile Navigation

Saturday, February 4, 2012

, ,

विंदांना श्रद्धांजली - आणखी काही कणिका

Asha-KD - 9:46 AM
२. प्रेम
सत्य युगाच्या अखेर झाली
प्रेम-द्वेष यांच्यात लढाई
द्वेषच होई विजयी आणि,
प्रेम लपे आईच्या हृदयी!

३. चंद्र आणि क्षय
चंद्र जाहला क्षयी कशाने?
शापबलाने, म्हणती कोणी;
कुजबुकला पण तो माझ्याशी;
या कवितांनी! या कवितांनी!

४. दर्पण
परमेशाला गमलें, आपण
रुप पहावें अपुले सुंदर;
आणिक केला त्यानें दर्पण;
तोच समजतो आपण सागर!

५. पदवीजिवंत असता, महाकवे, तुज
मिळतील निव्वळ शिव्या घरोघर;
तूं मेल्यावर, त्या मोजुनियां
मिळविल कोणी पदवी त्यावर

६. नारदाचा वारस
नारद मेला; मी रडलो मग;
कोण कळी त्या लाविल नाहक!
शोक कशाला? वदला ईश्वर,
धाडुनि दिधला मी संपादक!

७. इतिहासइतिहासाचे अवघड ओझे
डोक्यावर घेउनी ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
चढुनि त्यावर भविष्य वाचा

८. नायक
रामायण वाचुनिया नंतर
बोध कोणता घ्यावा आपण
श्रीरामासम मिळता नायक
वानर सुद्धा मारिती रावण

९. खळी
स्वर्गामधुनी येता बालक
अमृत त्याचे काढुन घेती
उरे रिकामी वाटी जवळी
ती खळी ही गालावरती

[संदर्भ: हितगुज]

__विंदा करंदीकर

0 comments:

Post a Comment